२२ सप्टें. शनिवार, २०२४ रोजी, प.पू.स्वामीजीं सोबत आमचा दिवस अतिशय अविस्मरणीय झाला.
प.पू .स्वामी स्वरूप स्वानंद यांच्याबरोबर शिला कुलकर्णी, अपर्णा कानडे , स्मिता व्यवहारे हे साधक वडकी येथील दिव्य जीवन वाटिका आश्रमात गेले होते. आश्रमातील सर्व दर्शन तसेच प.पू.स्वामी विद्यानंदमहाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. एक तास ध्यानही केले. चार वाजता, प.पू.स्वामी स्वरूप स्वानंद सर्वांना आईसाहेबांच्या खोलीत घेऊन गेले. आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेथे स्वामींजींनी आपल्या वडिलांच्या तसेच त्यांच्या लहानपणी वाड्यात घडलेल्या गोष्टी त्यांच्या मधूर वाणीने कथन केल्या. संसारात राहून स्वामी विद्यानंद संत पद्धतीने कसे जगले याचे वर्णन केले .
आश्रम कशासाठी काढला, हनुमंताची, विष्णूची स्थापना का केली, तर हे सर्व आपल्या शिष्यांचा उद्धार व्हावा म्हणून !
आध्यात्मिक पद्धतीने आपल्या पूर्वजांची आठवण कशी काढायची हा विचार स्वामीजींनी मांडला.
प.पू.स्वामी स्वरूप स्वानंद यांना त्यांच्या वडिलांबद्दलचे प्रेम, ओढ किती आहे हे दिसून येत होते.
प्रत्येक शिष्याने आपले स्वामी संसारात राहून कसे जगले याचे अनुकरण का करू नये!
परमश्रद्ध्येय आईसाहेबांनी सुद्धा आपल्या रसाळ वाणीने निरूपण केले. त्या म्हणाल्या स्वामींच्या शेजारी माझी पण समाधी बांधली आहे. तेंव्हा त्यांनी स्वामींना विचारले होते, " हे कोणासाठी करता आहात?" तेव्हा ते म्हणाले की," हे तुमच्यासाठी आहे !" तेव्हा त्या गप्प झाल्या .
पुरुष आणि प्रकृती यांचे हे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे .
प.पू स्वामीजींची आणि आ.श्री.शेखर आहेर,
श्री.प्रशांत आहेर, सौ.कुमुदिनी वेदपाठक आणि श्री. वेदपाठक हे
प.पू.स्वामी विद्यानंद यांचे साधक, यांची पण भेट झाली.
हा प्रसंग स्वामी कृपेने सहज प्रत्यक्ष अनुभवता आला.
स्वामीजींना धन्यवाद!!
वृत्तांकन:
सौ. शुभांगी पाटील
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे. )